TOD Marathi

जालना जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सभासद नोंदणी अभियान राबवावे. लोकांच्या दारात जाऊन जर सभासद नोंदणी केली तर ती जनतेच्या मनात राहते. तुम्ही मला ताकद दाखवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil in Jalna) यांनी जालना जिल्ह्याच्या कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात आज सत्तारूढ पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ४० आमदारांसाठी १०६ आमदांराना वेठीस धरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आपल्याला आपल्या जिल्ह्यातील चित्र बदलायचे असेल तर प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवायला हवा, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

संघटनात्मक बांधणीसाठी मागील विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या मतदाना इतकी सभासद नोंदणी आपल्या जिल्ह्यात झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने आपली जबाबदारी ओळखून सभासद नोंदणी अभियानात हिरीरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री आणि आमदार राजेश टोपे यांनी केले. (MLA Rajesh Tope in ncp meeting Jalna)

या बैठकीस माजी खा. जयसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख तथा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.